राज्य शिक्षण मंडळाने 10 वी -12 वी परीक्षेसंदर्भात घेतले महत्वाचे निर्णय - प्रत्येकाने वाचा


 📣 *राज्य शिक्षण मंडळाने 10 वी -12 वी परीक्षेसंदर्भात घेतले महत्वाचे निर्णय - प्रत्येकाने वाचा







✒️ राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने आज स्पष्ट केले आहे.


🗣️ तसेच 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्च , तर 10 वी 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार - अशी माहिती राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी  दिली आहे.


🤷‍♂️ *कसे असणार परीक्षेचे स्वरूप ?*


🔰 जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ शकले नाहीत - ते विद्यार्थी लेखी परीक्षेनंतर ही परीक्षा देऊ शकणार आहेत , ५ एप्रिल ते २२ एप्रिल या काळात या परीक्षा होणार आहेत.


🔰 विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत परीक्षा केंद्र असेल - १५ किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी असेल तर त्या शाळेला उपक्रेंद मिळणार आहे.


🔰 लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटे अधिक वेळ - तर ७०-१०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास जास्त वेळ देण्यात येणार.


🔰 सकाळच्या सत्रातील परीक्षा १०.३० वाजता सुरु होणार आहे ,तर विद्यार्थ्यांना १०.२० वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येणार.


🔰 तर दुपारच्या सत्राची परीक्षा २.३० वाजता सुरु होईल आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका २.२० वाजता देण्यात येणार आहे.


🔰 दरम्यान ७५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा असणार - याव्यतिरिक्त प्रात्यक्षिक परीक्षा शाळेतील शिक्षकच घेतील.


🪀

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा